एकूण सर्व गांधींविचार ‘हिंद स्वराज्य’मधील तीस हजार शब्दांत सामावलेले आहेत!
१९०९ पासून ‘हिंद स्वराज्य’ची प्रशंसा आणि टीका सुरू आहे. १९३८ मध्ये मिल्टन मुरे यांनी ‘अध्यात्मावरील अभिजात ग्रंथ’ म्हणून याचा गौरव केला. यात त्यांना आध्यात्म कोठे आढळले तेच जाणो. कदाचित त्यांचा अध्यात्माचा आशय वेगळा असावा. तर लॉर्ड लोथियन यांनी ‘एकूण सर्व गांधींविचार’ हिंद स्वराज्यमधील तीस हजार शब्दांत सामावलेले आहेत, असे म्हटले आहे. हा निकष किती योग्य आहे, हे प्रा. बेन्नूर या पुस्तकातून सिद्ध करून दाखवतात.......